II आम्ही गाव तंटामुक्त करणार I आम्हीच प्रगतीचे शिलेदार होणार II
........चला आपले गाव तंटामुक्त करूया II शांततेतून समृद्धीकडे II
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात 'महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम' राबविली जाते व प्रत्येक वर्षाच्या १५ आगस्ट च्या दिवशी ग्रामसभा घेण्यात येते व ग्रामसभेत ठराव मांडून १५ ते २० लोकांची समिती नेमली जाते. त्या समितीला नाव दिले जाते " महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती "
समितीचा अध्यक्ष गावातीलच प्रभावी/शिक्षित व्यक्तीस बनविण्यात येते. तंटामुक्त गाव समिती चे मुख्य कार्य म्हणजे गावातील तंटे गावातच समजुतीने तंटामुक्त समिती मार्फत मिटविणे. जुने प्रलंबित तंटे (तालुक्यातील पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेले) पोलीस अधिक्षक/बिट हवालदार यांच्या मध्यस्थीने मिटविणे. ज्या गावात एक वर्षात कुठलेही तंटे झाले नाहीत व झाले असल्यास जे तंटे/भांडण तंटामुक्त गाव समिती मार्फत मिटविण्यात आले अश्या गावास मुखमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या मार्फत विशेस बक्षीस दिले जाते. त्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्या काम पाहता व ज्या गावाने चांगले काम केले त्यांना गुण दिले जातात.
अध्यक्ष - योगेंद्रसिंग डी. सिसोदिया
तंटामुक्त गाव समिती, बोरगाव (जातोडा),
ता. शिरपूर, जि. धुळे - ४२५ ४०५
मो. नं. ९८५०२७९२२२ e mail - tantamuktagav@gmail.com
No comments:
Post a Comment